रेप वर रेप होतोय आज आपल्या देशात , का...? का करायची गरज ? अरे आज ह्या पोरींचा रेप झाला उद्या तुमच्या मुलींवर होईल तुम्ही सहन करू शकणार...? नाही ना. ह्या पोरींना आपलं जीवन आणि या धरतीवर श्वास घेणे नकोस झालंय , काही तर सहन करून गप्प राहतात पण जे सहन करू शकत नाहीत त्यांचं काय जीवन संपलंचना काय राहिलं त्यांच्या जीवनात तुम्ही त्यांची इज्जत आणि अब्रू लुटली कधी विचार केलाय की त्यांना कसं वाटलं असेल तुम्ही तर त्यांची संपूर्ण जिंदगी बरबाद करून टाकली लाज नाही वाटत तुम्हाला एक पोरीची इज्जत लुटता.तुम्हाला काय वाटतं महिला नाजूक आणि कमजोर आहेत अरे हट हा डोक्यातून विचार काढून टाक जितक्या लवकर काढता येईल तितक्या लवकर काढ...,
ह्या 'मेरी कोम' सारख्या महिला जर ह्या असल्या पुरुषांसमोर उभ्या राहिल्या ना आयुष्यात कधीही रेप करायचं तर विसरून जा पण रेपचं नाव घ्यायला सुद्धा फाटेल.
हे असले पुरुष एका मर्द च्या नावावर कलंक आहेत.ही असली माणस, रक्षाबंधन मध्ये आपल्या बहिणीकडून राखी तर बांधून घेत असतीलना मग त्यांना तर राखी ची किंमत आणि त्या रक्षाबंधनचं महत्व चांगल्याप्रकारे समजावून सांगायला पाहिजेत. ते वचन जे आपल्या बहिणीकडून घेतातत्या वचनाची तर त्यांना काडीची किंमत नसेलच,म्हणूनच हे मनुष्यात एका जनावरचा रूप घेऊन ह्या पोरीन चा रेप करतात.आपल्या राष्ट्रीय तारांमध्ये स्पष्ट आणि सरळ भाषेत लिहिलंय की India Is My Country. All Indians Are My Brothers And Sisters. म्हणजेच भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत.जरी तुम्हाला अजूनही समजले नसेल तर तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगतो...आत्तापर्यंत ज्यांची तुम्ही इज्जत लुटली आणि बलात्कार केला हे दुसरे कोणी नाही पण तुमच्या बहिणी होत्या.जरी त्यांनी तुम्हाला राखी बांधली नसेल किंवा त्या तुमच्या खऱ्या रक्ताच्या बहिणी नसतील पण काहीही असो आपलं राष्ट्र तारण जे आहे ते स्पष्ट सांगतं.
आता येऊया 16 डिसेंबर 2012,वेळ रात्रीची 09:54, ठिकाण - दिल्ली ,भारत.ही तारीख,हा वेळ आणि हे ठिकाण कोणालाच लक्षात नसेल.. त्या बिचार्या आई बाबांना सोडून.ही गोष्ट आहे एका 23 वर्षाच्या मुलीच्या सामूहिक बलात्काराची. मुलगी रात्रीचे 09:54 ला एका बसमधून आपल्या मित्रास बरोबर जात होती..,इतक्यात बस मधल्या चालकासह इतर सहा जण होते ज्यांनी या निर्दोष,बेकसूर पोरीचा सामूहिक बलात्कार केला आणि तिच्या मुली सोबत त्याच्या मित्रालाही खूप मार दिला होता. ही गोष्ट होती एका प्रायव्हेट बस मधलीच ज्याला लागले सात वर्ष न्याय मिळायला.
भारतात एकूण 24,923 बलात्कार प्रकरणे झालेत. आणि संपूर्ण जगात 2,50,000 पेक्षा जास्त. संपूर्ण जगाच्या सोडा पण आपल्या देशाचं काय? ह्याच्या वरूनच कळत असेल किती कमी कठोर आहेत आपल्या देशाचे कायदे.ह्या असल्या कायद्यामुळेच हळूहळू जिंकत चाललेत गुन्हेगार, आपल्या देशात. कधी प्रश्न विचारला आहे का स्वतःला की का..? का जिंकत आहेत हे गुन्हेगार ? ह्या गोष्टीला फक्त आपल्या देशाचे कायदे मायने नाही ठेवत परंतु ह्याला जिम्मेदार राहतो ते आपणही. हे माणसाच्या वेश मध्ये फिरत आहेत हे हैवान.का बरं आपण ह्या असल्या हैवानांशी घाबरून राहायचं , जर आपण विचार केला ना तर आपण भारतीय एकत्रित होऊन आत्ताच, याच वेळ आणि याच क्षणी आपण या हैवानांचा नाश करू शकतो.
आणि हा लोकांचं म्हन्न काय असतं की मुलीने लांब कपडे घालावे...संपूर्ण शरीर झाकले पाहिजेत.मुलगी शर्ट आणि हाफ पॅन्ट वर राहूच शकत नाही....जर प्रश्न विचारला... का? तर उत्तर असं मिळेल की...त्या मुलिचा रेप होऊ शकतो.ह्या असल्या लोकांना काय बोलायचं हेच मला कळत नाही.
मी पण गप्प होतो एवढ्या दिवस कि आता तरी एक चांगला कायदा येईल आणि महिलांना न्याय मिळेल.हेचीच अपेक्षा करत आजही वाट बघतोय..,सांगा ही वेळ कधी येईल जेव्हा रात्रीचं कुठलीही मुलगी फिरेल आणि तिच्या आई-बाबांना अजिबात चिंता नसेल..,सांगा... ही वेळ कधी
येणार? तर आत्ता, उचला आपल्या नजरा ,बघा थेट सरळ..
आता घाबरून काही होणार नाही लढा बिंदास लढा ह्या असल्या लोकांना लवकरात लवकर दंड भेटलाच पाहिजेत.. आणि असल्या लोकांना विचारायचं...का केलस तू असं ? आणि थेट तोंडा समोर सांगायचं कि तुझ्या आईला लाज वाटते सांगायला कि तु माझा मुलगा आहेस.
आणि मला आश्चर्यचकित व्हायला होतं हे आयकुन कि रेप झाल्यावर पण धमे ,जात ,पात चा विषय काढतात. आणि ह्याच विषयामुळे मला लाज वाटते कि मी ह्यापृथ्वी वर राहतो .अशे कित्येक लोकं असतील ज्यांना अशी लाज वाटतं असेल, होना..?
तर चला आज पासुनच दाखवा आपली हिम्मत , जागवा आपली मानुस्की आणि लढा.... लढत रहावा जो परियंत सत्य आणि न्याय मिळत नाही.
तर बनवा कायदे लवकरात लवकर.., I Love My India
आणि मला असं वाटतं की माझ्या भारतात चांगली लोकं रहावी आणि हा..... तुमच्या सारख्या हैवान लोकान साठी आमच्या देशात कुठेही जागा नाही....
My Dream Is To See A RAPE Free India..!!
बलात्कारमुक्त भारत पाहण्याचे माझे स्वप्न आहे...
'जय हिंद जय भारत'
धन्यवाद..!!